श्री. भगवान करांडे हे शेती एका पारंपारीक पध्दतीने न करता, व्यावसायिक दृष्टिकोनातून नवनवीन प्रयोगांसहित करत असतात.
त्यांच्याकडे घेवडा (वाल) पिकासाठी जवळपास दिड ते दोन एकर क्षेत्र असते. दरवर्षी रब्बी हंगामा मध्ये ते घेवडा पिकाची टोकण पध्दतीने पेरणी करतात. पेरणी नंतर 40-45 दिवसांनी त्यांना पहिला तोडा मिळतो. पिकाची वाढ, शाखिय विकास, फुटवे आणि फुलकळीची संख्या यावरती त्यांचे पीक जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत उत्पादन देते. या दरम्यान त्यांना नागअळी, फळ पोखरणारी अळी व मावा अश्या किडींचा बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे त्यांचा रासायनिक खते, मशागत आणि मजूर या सर्वांवर खूप जास्त खर्च होतो.