दत्तात्रय नामदेव कुंजीर गेल्या 20 वर्षांपासून फळभाज्या व भाजीपाला पिकांची शेती करत आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव व कोणत्या हंगामाध्ये कोणता भाजीपाला, फळभाज्यांची आवक होते. या सर्व गोष्टींचा ते नेहमी अभ्यास करत असतात.
कुंजीर यांनी चालू रब्बी हंगामामध्ये 1 एकर क्षेत्रावर कोबीच्या रोपांची लागण केली. परंतू कोबीवर रोप अवस्थेपासून ते काढणीपर्यंत जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोग उदा. करपा, भुरी, काळे ठिपके, रोप मर असे बरेच रोग येत असत. तसेच वेगवेगळ्या रस शोषक किडी व पाने खाणारी अळी यांचा खूप प्रादुर्भाव होत असे. त्यांचे रासायनिक औषधांवर बरेच पैसे व कष्ट वाया जात होते. रसायनांच्या अति वापरामुळे पिकाची प्रतिरोध क्षमता कमी होऊन जमिनीचा पोत कमी होत असे.