हरिशचंद्र दसाराम टेकाम हे पारंपारिक शेती करत असताना कमीतकमी रासायनिक खते व औषधे वापरुन, किफायती शेती करण्याकरिता प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक घेतले जाते. भात पिकावर येणारी किड व रोग यांच्या व्यवस्थापनावर त्यांचा बराच खर्च होत असे. टेकाम हे भात पीक रोप लागण पध्दतीने करतात. ते भात पिकासाठी आवश्यक खते ही शेत-जमिन चिखलणी करताना वापरतात.
चालू वर्षी उन्हाळी भात पीक घेत असताना हरिशचंद्र टेकाम यांनी भात-1009 कार वाणाची निवड केली. लावणी करण्याअगोदर चिखलणी करतेवेळी त्यांनी प्रति एकरी 1 लि. बायोफिट एन.पी.के आणि बायोफिट शेत अशा जीवाणूयुक्त खतांचा वापर केला. त्यानंतर 30 दिवसांच्या अंतराने त्यांनी बायोफिट एन.पी.के व बायोफिट शेत प्रत्येकी 1 लि. प्रमाणे 1 एकर क्षेत्रासाठी पाटपाण्याच्या माध्यमातून दिले. त्यामुळे भात पिकाची जोमाने वाढ झाली. तसेच रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च टळला.