तुषार श्रीराम चौधरी हे गेल्या 20 वर्षांपासून शेती करत आहेत. यांच्याकडे 10 वर्षांपासून ‘नागपूर संत्रा’ जातीची फळबाग आहे. त्यांनी 6 एकर बागेमध्ये एकूण 650 संत्र्याची झाडे आहेत.
प्रत्येक वर्षी त्यांना प्रति एकरासाठी साधारणतः रुपये 65 हजार खर्च येतो. तसेच फळ गळून जाणे, करपा रोग यामुळे त्यांचे बरेच नुकसान होते. त्याचप्रमाणे शेणखत उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना खर्चिक रासायनिक खतांचा वापर करावा लागत असे. याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होत असे.